नवोदय परीक्षेला जाताना आपण काय काय सोबत घ्यावे , पेपर सोडवताना काय काळजी घ्यावी ते आज आपण पाहणार आहोत..
घरून लवकर निघा ,सावकाश जा ,वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहचा.
* साडेदहा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहचा.
* नवोदय परीक्षेला जाताना तुमचे हॉल तिकीट दोन प्रतित सोबत घेऊन जा.
* परीक्षेला जाताना उत्तर पृष्ठावर लिहिण्याकरता केवळ निळ्या किंवा काळ्या बॉलपेनचाच वापर करा, त्यासाठी तीन पेन सोबत घेऊन जा.
* परीक्षेमध्ये पेन्सिलचा वापर करण्यास सक्त मनाई असते.
* सोबत एक पॅड घेऊन जा.
* तुमच्यासोबत एक हात रुमाल घेऊन जा, कारण तुमच्या तळ हाताला नेहमी घाम येत असतो, तो घाम साफ करण्यासाठी.
* पाण्याची एक बॉटल सोबत घेऊन जा.
* कच्चे काम प्रश्नपत्रिका वर करा, कच्च्या कामासाठी जी जागा आहे त्यावरच करा.
* पेपर सोडविताना तुम्हाला पूर्ण दोन तास वेळ घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा. गडबड करून पेपर लवकर सोडू नका वेळेचे नियोजन करा.
* तुम्हाला प्रत्येक खंडात स्वतंत्रपणे क्वालिफाय व्हावे लागेल, त्यासाठी प्रत्येक खंडाची उत्तरे द्यावी लागतील.
'नवोदय परीक्षेला जाताना'.....
* पेपर सोडविताना प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा, त्यानंतरच प्रश्नाचे अचूक उत्तर पर्यायातून निवडा.
* मानसिक क्षमता परीक्षण यावरील प्रश्न सोडवताना सूचना काळजीपूर्वक वाचा.
* मानसिक क्षमता परीक्षण यावरील प्रश्न दहा प्रकार तुम्हाला येतात, पण अति आत्मविश्वास करू नका, प्रत्येक प्रश्नातील प्रत्येक पर्यायातील आकृती पाहूनच तुमचे उत्तर निवडा गडबडीत उत्तरे निवडू नका.
* चाळीस आकृत्या अचूक आल्याच पाहिजे हे टार्गेट ठेवा.
* अंकगणित वरील प्रश्न सोडविताना प्रत्येक प्रश्न सोडविल्यास उत्तर अंदाजे करू नका ,कितीही सोपा प्रश्न असला तरी तो सोडवाच.
*कधी कधी सुरुवातीला पाच ते सहा प्रश्न खूपच सोपे येतात आणि मग आपण रिलॅक्स होतो, उत्तरे तोंडी करायचा प्रयत्न करतो आणि इथेच आपण खऱ्या चुका करतो हे लक्षात ठेवा.
* नवोदयचे खरे मेरिट हे गणितावरच आधारित असते ,त्यामुळे गणितावर जास्त फोकस करा.
* महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात खूप स्पर्धा आहे हे लक्षात ठेवा, जिल्ह्यात जवळपास आठ ते नऊ हजार विद्यार्थी नवोदय परीक्षेला बसतात आणि त्यातील फक्त 80 विद्यार्थी नवोदय परीक्षेला सिलेक्ट होतात.
* भाषा परीक्षण म्हणजेच उताऱ्यावरील प्रश्न सोडविणे अगोदर उतारा व्यवस्थित वाचून घ्या, त्यानंतर एक एक प्रश्न सोडवायला सुरुवात करा ,उत्तर निवडताना तुमचे उत्तर त्या उत्तराशी जुळणारे आहे का याची खात्री करा.
* उतारावरील वीस ची वीस प्रश्न आपले अचूकच आले पाहिजे हे प्रत्येकाने टार्गेट ठेवा.
* शेवटी एकच सांगतो तुम्ही वर्षभर केलेल्या अभ्यासाला 2 तासात 80 प्रश्नात अचूक पर्याय निवडून यशाच्या सर्वोच्च शिखरावर व्यवस्थित गुंफण करा, आणि नवोदयचे तुमचे स्थान निश्चित करा. यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! 💐
"नवोदय परीक्षेला जाताना".....
परीक्षेला जाता जाता पुढील लिंक वर क्लिक करून नवोदय संदर्भाचे सर्व व्हिडिओ पहा... https://www.youtube.com/@ramgovardhandole8936
In today's technological age ,things parents should do for their kids during vacations to avoid too much contact between students and parents.
Things parents should do for kids on vacation.
Keeping kids engaged and active during the holidays these days has become quite a challenge for parents to do the following.
1) Eat breakfast and dinner with your child . Don't late the food go to waste after the meal ,let them wash their plate.
2) Encourage students to do chores like picking vegetables, washing clothes ,sweeping at home.
3) Take children with you to the place where you are working. How hard do you work? What work do you do ? How does it work ? Let the children know this ,give the information to the children, that means they will realize how much their father is working for us.
4) Give students an opportunity to chat with their grandparents at home. Take pictures of the children with them.
5) Go to the families who live in your neighbourhood and give them and opportunity to grow closer . Also invite your friends children to their home.
6) Take children along to local festival,bazaars in your neighbourhood or nearby villages. inform them about it.
'Things parents should do for kids on vacation'.
7) You yourself should reduce the use of mobile phones because you are children are immidating you.
8) Tell your children about your childhood memories and about your ancestors.
9) Buy kids at least one extra reading book to read during vacation.
10) Get rid of the idea that you are a good parent by catering to your children's every whim. Don't give in to all their insistence, make them aware of the situation.
11) Don't worry about letting children play, fall and spoil clothes during vacations.
12) Teach swimming to children during vacations ,teach them field games.
13) Express your joy with children.
14) Make children study for 1 to 3 hours daily according to the class.
15) Teach kids to cook ask them to cook ,their favourite dishes.
16) Teach your children to care for the environment.
17) Include the habit of exploring something new in children during vacations .
18) Develop responsible habits in children. for example ask them to clean their room after themselves.
19) Parents should develop new skills with children.
Teachers and you parents together let us all make the future citizens of tomorrow.
राज्यातील प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करणे तसेच शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने आदेश निर्गमित करणे बाबत...
राज्य मंडळ राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळा मधील विद्यार्थ्यांना दिनांक २१.०४.२०२३ पासून सुट्टी जाहीर.
शासन परिपत्रक : दिनांक: २०.०४.२०२३
राज्यामध्ये काही दिवसापासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याची तसेच शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्यानुसार या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
१) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २१.०४.२०२३ पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे .
२) राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास ,विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.
राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत एक वाक्यता राहण्याच्या दृष्टीने विदर्भ वगळता सर्व विभागातील शाळा दरवर्षी दिनांक १५ जून रोजी व त्या दिवशी सुट्टी असल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू होतील व विदर्भ विभागातील शाळा दरवर्षी दिनांक ३० जून रोजी व त्या दिवशी सुट्टी असल्यास त्याचे पुढील दिवशी सुरू होतील .
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.Maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२३०४२०२००३३८८४२१ असा आहे हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020 महत्त्वाचे मुद्दे
महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दीपक केसरकर साहेब यांनी केली आहे.
केंद्र सरकारने नवे शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे .तब्बल 34 वर्षानंतर देशात शैक्षणिक धोरण लागू होणार आहे .महाराष्ट्र राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक धोरण लागू केलं जाणार आहे. चला तर पाहूया नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत कोणते -कोणते बदल करण्यात आले आहेत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020
भारतात आजपर्यंत एकूण चार शैक्षणिक धोरण आहेत. पहिले शैक्षणिक धोरण 1968 मध्ये ,दुसरे 1986 मध्ये तयार करण्यात आले आहे ,तिसरे शैक्षणिक धोरण 1992 मध्ये करण्यात आले आणि आता चौथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. नवीन शिक्षण धोरण तब्बल 34 वर्षानंतर बदलले आहे.
* शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे आणि भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.
* नवीन शैक्षणिक धोरण हे पाच स्तंभावर लक्ष केंद्रित करते : प्रवेश, , समानता ,गुणवत्ता, परवडणारी आणि जबाबदारी.
नवीन शिक्षण धोरणाची(NEP )ठळक वैशिष्ट्ये :
नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट भारतातील सर्व मुलांना दर्जेदार आणि न्याय्य शिक्षण देण्याचे आहे. धोरणातील काही प्रमुख ठळक मुद्दे खालील प्रमाणे आहेत...
* 3 ते 14 वर्षे वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. यापूर्वी हा वयोगट 6 ते 14 वर्षे होता.
* बोर्ड फक्त बारावीच्या वर्गाला असेल.
* महाविद्यालयीन पदवी चार वर्षाची असेल.
* दहावी मंडळ रद्द
* एम फिल बंद असेल.
* नववी ते बारावीच्या सत्र परीक्षा असतील.( semester Exam)
* शालेय शिक्षण 5+3+3+4 या सूत्राच्या अंतर्गत शिकवले जाईल. यापूर्वी 10+2 असे सूत्र होते.
* इयत्ता सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश.
* पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा प्रयत्न.
* विद्यार्थ्यांचं ते स्वतः, सह विद्यार्थी, शिक्षक मूल्यांकन करणार.
* पदवीसाठी कला आणि विज्ञानात भेद न करता विषय निवडण्याची मुभा.
* सरकारी आणि खाजगी शाळा मधील शिक्षणात समानता.
चला तर पाहूया नवीन शिक्षण धोरणाचे सूत्र 5+3+3+4म्हणजे काय?
* 5 वर्षे मूलभूत (Fundamental)
1) नर्सरी - 4 वर्षे
2) ज्युनिअर केजी- 5 वर्षे
3) सिनियर केजी -6 वर्षे
4) इयत्ता पहिली- 7 वर्षे
5) इयत्ता दुसरी- 8वर्षे
* 3 वर्षाची प्रारंभिक शाळा
1) इयत्ता तिसरी- 9 वर्षे
2) इयत्ता चौथी- 10 वर्षे
3) इयत्ता पाचवी- 11 वर्षे
* 3 वर्षांची माध्यमिक शाळा
1) इयत्ता सहावी- 12 वर्षे
2) इयत्ता सातवी- 13 वर्षे
3) इयत्ता आठवी- 14 वर्षे
* 4 वर्षे माध्यमिक शाळा
1) इयत्ता नववी- 15 वर्षे
2) इयत्ता दहावी- 16 वर्षे
3) इयत्ता अकरावी- 17 वर्षे
4) इयत्ता बारावी- 18 वर्षे #
'नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020 महत्त्वाचे मुद्दे'
या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची सूत्राची माहिती पुढील प्रमाणे-
# पायाभूत टप्पा ( 5 वर्षे)
या टप्प्यात मुलाच्या शिक्षणाची पहिली पाच वर्षे समाविष्ट असतील. शिक्षणाच्या पहिल्या तीन वर्षात मुलांना जवळील अंगणवाडी ,बाल वाटिका किंवा समुदायावर आधारित नर्सरीमध्ये शिकवले जाईल. शाळेच्या इतर दोन वर्षांमध्ये विद्यार्थ्याला विविध स्तरावर खेळ आधारित क्रिया ,कला आधारित शिक्षणाद्वारे मूलभूत कौशल्य आणि ज्ञान शिकविले जाईल.
# तयारीचा टप्पा (3 वर्षे )
या टप्प्यामध्ये 8 ते 11 वयोगटातील विद्यार्थी असतील त्यांच्यामध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्य विकसित करण्यासह मूलभूत शिक्षणावर लक्ष केंद्रित करेल .पूर्वतयारीचा टप्पा विद्यार्थ्यांना विविध विषयांमधील संकल्पना समजून घेण्यास मदत करेल.
# मध्यम अवस्था (3वर्षे)
या टप्प्यामध्ये 11 ते 14 वयोगटातील विद्यार्थी असतील, या विद्यार्थ्यांना वाचन ,लेखन ,मूलभूत भाषा कौशल्ये यासारखी मूलभूत शैक्षणिक कौशल्य विकसित करणे अपेक्षित आहे.त्यांच्याकडून टीमवर्क, समस्या सोडवणे ,विचार करणे यासारखे जीवन कौशल्य विकसित करणे अपेक्षित आहे.
# माध्यमिक टप्पा ( 4वर्षे)
या टप्प्यामध्ये 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थी असतील या टप्प्यात त्यांना इंग्रजी ,गणित ,विज्ञान आणि सामाजिक अभ्यास यांचा समावेश असलेला मुख्य अभ्यासक्रम पूर्ण करणे अपेक्षित आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांना भाषा , कला , व्यावसायिक विषयासह विविध निवडकांमधून निवड करण्याची संधी असेल.
महत्वाचे मुद्दे :
* आता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ त्यांची मातृभाषा, त्यांची स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषा शिकवली जाईल. इतर विषय जरी तो इंग्रजी असला तरी एक विषय म्हणून शिकवला जाईल.
* आता दहावीची बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक नाही आता फक्त बोर्ड परीक्षा बारावी मध्ये द्यावी लागेल.
* महाविद्यालयीन पदवी आता तीन व चार वर्षाची असेल म्हणजेच, पदवीच्या पहिल्या वर्षात तुम्हाला प्रमाणपत्र (certificate)मिळेल, दुसऱ्या वर्षी पदविका असेल आणि तिसऱ्या वर्षी डिग्री मिळेल.
* केवळ पाठांतर करून परीक्षेत मिळणाऱ्या गुणांचे अवास्तव महत्त्व कमी करून कौशल्य व क्षमता विकासावर भर देण्यात येणार आहे.
* या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी, अनेक संस्था स्थापन केल्या जातील जेणेकरून हे धोरण सुरळीत चालेल.
* नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत जर एखाद्या विद्यार्थ्याला एखादा अभ्यासक्रम मध्यभागी सोडून ,दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असेल ,तर तो पहिला अभ्यासक्रमातून ठराविक काळासाठी ब्रेक घेऊन दुसऱ्या अभ्यासक्रमात सहभागी होऊ शकतो.
* नवीन राष्ट्रीय धोरणाचे उद्दिष्ट शिक्षणावर भर देऊन पाठ्यपुस्तकावरचे अवलंबित्व कमी करण्याचे आहे.
या शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण तसेच व्यावसायिक कौशल्याचा विकास होऊन तो शासनाला नोकरी मागणारा नाही , तर इतरांना नोकरी देणारं होईल व पुढील भविष्याचा वेध घेण्याच्या त्याच्या दृष्टीचा विकास होईल असे या धोरणावरून मला वाटते.
या नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपण निश्चितच जागतिक दर्जा गाठू तसेच देशाची वाटचाल उज्वल भवितव्याकडे होणार हे निश्चित.
" नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020 महत्त्वाचे मुद्दे"
संप काळातील कालावधी असाधारण रजा ऐवजी अर्जित रजा म्हणून करण्याबाबत... शासन निर्णय
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ,महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत.....
संप काळातील कालावधी असाधारण रजा ऐवजी अर्जित रजा म्हणून करण्याबाबत..
शासन निर्णय दिनांक 13 एप्रिल 2023...
प्रस्तावना: बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या दिनांक 14 मार्च ते 20 मार्च 2023 या कालावधीत संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी /अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते, त्यांची अनुपस्थिती संदर्भ क्रमांक 2 येथील दि. 28 मार्च 2023 च्या शासन निर्णयान्वये "असाधारण रजा "म्हणून नियमित करण्यात आली होती. या आदेशात सुधारणा करून अनुपस्थितीचा कालावधी " असाधारण रजा "ऐवजी "अर्जीत रजा" म्हणून समजण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:-
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ,महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या कालावधीत पुकारलेल्या संपामध्ये जे शासकीय कर्मचारी /अधिकारी सहभागी झाले होते ,त्यांची अनुपस्थिती एक विशेष बाब म्हणून व पूर्वोद्धारण होणार नाही या अटीवर "असाधारण रजा" ऐवजी "अर्जित रजा" करण्यास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक 202304131612516907असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदांच्या भरती बाबत...
आज कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालय यांना विस्तार अधिकारी (शिक्षण विभाग) व केंद्रप्रमुख यांच्या पदांच्या भरती बाबत, मंजूर पदे ,कार्यरत पदे व रिक्त पदांचा तपशील मागविण्यात आलेला आहे..
विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरतीबाबत..
प्रति,
विभागीय आयुक्त
विभागीय आयुक्त कार्यालये ( सर्व)
विषय: विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरतीबाबत...
संदर्भ : शासनाचे समक क्रमांकाचे दिनांक 05.05.2022 चे पत्र
शालेय शिक्षण विभागाच्या गुणोत्तर वाढीसाठी क्षेत्रीय स्तरावरील विस्ताराधिकारी( शिक्षण )व केंद्रप्रमुख हि पदे महत्वाची असून राज्यांमध्ये सदरची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
या विभागाच्या दि.10.06.2014 च्या आधी सूचनेतील तरतुदीनुसार आपल्या अधिपत्याखालील विस्तार अधिकारी( शिक्षण) या पदावरील रिक्त पदांचा आढावा घेऊन सदरची पदे भरण्याबाबत संदर्भातील पत्रान्वे निर्देश दिलेले होते .तथापि, प्रस्तुत प्रकरणी केलेल्या कार्यवाही बाबत शासनास काहीच अवगत करण्यात आलेले नाही .
तरी उक्त नमूद दिनांक 10.06.2014 च्या आधी सूचनेनुसार विस्तार अधिकारी( शिक्षण) (श्रेणी -2 )व विस्तार अधिकारी (शिक्षण) ( श्रेणी -3) संवर्गातील तालुका निहाय मंजूर पदे ,कार्यरत पदे व रिक्त पदांचा तपशील est14-rdd@mah.gov.in या ईमेलवर दिनांक 10.04.2023पर्यंत पाठविण्यात यावा ही विनंती.
माझा मुलगा मी जिल्हा परिषद शाळेतच टाकणार.... कारण वाचा
ज्यांचा मुलगा किंवा मुलगी 2023 मध्ये पहिली ला जाणार त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती...
आजच्या या स्पर्धेच्या युगात शिक्षण हे खूप महाग होत चाललेले आहे असे म्हणतात की, आजचे शिक्षण हे गरिबांचं नाही.... पण जर आपली मुलं जिल्हा परिषद शाळेत टाकली तर ते नक्कीच 100% यशस्वी होतील.
नमस्कार पालकांनो
आपला मुलगा जर 2023 मध्ये इयत्ता पहिली ला जाणार असेल तर तुम्ही त्यास जर इंग्रजी माध्यमाला घातले तर तुम्हाला कमीत कमी फी मुंबई ,पुण्याला तर 30हजार ते 1लाखाच्या आसपास असेल. ग्रामीण भागामध्ये पण इंग्रजी माध्यम फी जवळपास 20हजार ते 50हजार च्या आसपास आहे.... असेच जर तुम्ही नोकरी लागेपर्यंत ती भरत गेलात तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा की तुमची फी किती जाते....
एवढी फी भरून सुद्धा नोकरी मिळेलच याची शाश्वती नाही आहे सध्याच्या काळात...
जर मी माझा मुलगा इंग्रजी माध्यमाला न घालता जिल्हा परिषद शाळेत घातला आणि त्याला जी फी भरायची आहे ती फी मी जर शेअर मार्केटमध्ये गुंतवली उदा. रिलायन्स ,टाटा, मारुती सुझुकी, बजाज, इन्फोसिस, विप्रो ,एच एफ डी सी बँक... यासारख्या जगप्रसिद्ध कंपनीचे जर शेअर्स मी खरेदी केले तर ...
'माझा मुलगा मी जिल्हा परिषद शाळेतच टाकणार '. कारण वाचा
समजा त्याला पहिलीला पन्नास हजार भरायचे आहेत. ते पन्नास हजार मी शेअर मार्केटमध्ये टाकणार ,दुसरीला जी 60000 भरायचे ते मी शेअर मार्केटमध्ये टाकणार ,तिसरीला 70 हजार भरायचे आहेत ते मी शेअर मार्केटमध्ये टाकणार ,चौथीला ८० हजार भरायचे आहेत ते मी शेअर मार्केटमध्ये टाकणार ,असं करत करत त्याचे ग्रॅज्युएशन होईपर्यंत ,पंधरा ते सोळा वर्षे पैसे शेअर मार्केटमध्ये असणार आणि त्याची किंमत आता पहिल्या पन्नास हजाराची जवळपास तीस ते चाळीस लाख झाले असणार... असे सर्व जवळपास त्याचे शिक्षण होईपर्यंत अंदाजे आठ ते नऊ कोटी रुपये मिळतील.
आणि जर जिल्हा परिषद मध्ये घातले तर मुलगा कर्तत्ववान असेल तर तो स्वतःची प्रगती करेलच कारण इंग्रजीमध्ये फी भरून कर्तत्ववान होईल याची खात्री देणारी एकही इंग्रजी शाळा आज उपलब्ध नाही.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न असा तयार होतो. आज ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा ही उत्कृष्ट शिक्षण देत आहेत..
म्हणूनच मी माझा मुलगाही जिल्हा परिषद शाळेत घालणार आहे आणि त्याची जी रक्कम आहे ती शेअर मार्केटमध्ये गुंतवणार आहे.
जर तुम्ही तुमचा मुलगा जिल्हा परिषद शाळेत घातला तर जिल्हा परिषद शाळा ही वाचतील ,मातृभाषेतून शिक्षणही मिळेल आणि एका वडिलांची आयुष्याची कमाई सुद्धा वाचेल..
मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला कोण्या कंपनीत किंवा नोकर म्हणून चाकरी करायची गरज पडणार नाही उलट तोच इतरांना रोजगार देऊ शकेल.
बघा विचार करा आणि पटलं तर इतरांना शेअर करा...
"माझा मुलगा मी जिल्हा परिषद शाळेतच टाकणार".... कारण वाचा
एकविसाव्या शतकातील संगणकाच्या युगात वावरताना प्रत्येकाला यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणे आवश्यक आहे. ही तयारी योग्य प्रकारे झाली पाहिजे म्हणूनच भूमिती विषयाचे महत्त्वाचे नियम व सूत्रे आपण पाहणार आहोत.
स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे भूमिती चे नियम व सूत्रे-
* बिंदू : अतिशय अणकुचीदार टोकाने काढलेल्या टिंबाला बिंदू असे म्हणतात.
* रेषाखंड : रेषेवरील कोणत्याही दोन भिन्न बिंदूतून मर्यादित झालेल्या तिच्या भागाला रेषाखंड म्हणतात.
* रेषा : रेषा म्हणजे अनंतबिंदूंचा संच जो दोन्ही टोकांकडे अमर्याद असतो.
* दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते.
* एका बिंदूतून असंख्य रेषा जातात.
* एका रेषेवर अनंत बिंदू असतात.
* एका बिंदूतून अनेक रेषा काढता येतात.
* रेषा दोन्ही बाजूंनी अमर्याद असते.
* तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदूतून एकच रेषा करता येत असेल तर त्या बिंदूंना एकरेषीय बिंदू म्हणतात.
* जेव्हा तीन किंवा अधिक बिंदूतून जाणारी एकही रेषा काढता येत नाही तेव्हा त्या बिंदूंना नैकरेषीय बिंदू म्हणतात.
* एकाच बिंदूत छेदणाऱ्या तीन किंवा अधिक रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात व त्यांचे छेदनबिंदूला संपात बिंदू म्हणतात.
* समांतर रेषा :
* एकाच प्रतलात असणाऱ्या पण एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात.
* एकाच रेषेला लंब असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात.
* दोन समांतर रेषा परस्परांना कधीही छेदत नाहीत.
* किरण : एका ठराविक बिंदूतून एका दिशेकडे अमर्याद असणाऱ्या आकृतीला किरण म्हणतात.
* जेव्हा दोन किरणांचा आरंभबिंदू एकच असतो व दोन्ही किरण एकाच रेषेवर असतात तेव्हा ते किरण विरुद्ध किरण असतात.
* प्रतल: अमर्यादित सपाट पृष्ठभागाला प्रतल म्हणतात.
* प्रतल अनंतबिंदूंनी बनलेले असते.
* तीन नैकरेषेबिंदूतून फक्त एकच प्रतल जाते.
* परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषांमधून फक्त एकच प्रतल जाते.
* जेव्हा दोन प्रतले परस्परांना छेदत नाहीत तेव्हा त्यांना समांतर प्रतले म्हणतात.
* कोन: एकच आरंभबिंदू असलेल्या परंतु एकाच रेषेत नसणाऱ्या दोन भिन्न किरणामुळे तयार होणाऱ्या आकृतीला कोन म्हणतात.
* किरणांच्या संयोग संचाला कोन म्हणतात.
* कोन मोजण्यासाठी किंवा काढण्यासाठी कोनमापकाचा वापर करतात.
* शून्य अंश मापाच्या कोणाला शुन्यकोन म्हणतात.
* लघुकोनाचे माप 0 अंश पेक्षा जास्त व 90 अंश पेक्षा कमी असते.
* काटकोनाचे माप 90 अंश असते.
* विशाल कोनाचे माप 90 अंश पेक्षा जास्त व 180 अंश पेक्षा कमी असते.
* 180 अंश मापाच्या कोनाला सरळकोन म्हणतात.
* प्रविशाल कोनाचे माप 180 अंश पेक्षा जास्त व 360 अंश पेक्षा कमी असते.
* पूर्ण कोना चे माप 360 अंश असते.
* ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, त्या दोन कोनाला परस्परांचे पूरक कोन म्हणतात.
* ज्या दोन कोनाच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्या दोन कोनाला परस्परांचे कोटीकोन म्हणतात.
' स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे भूमिती चे नियम व सूत्रे'
* कोनाच्या शिरोबिंदूतून निघालेल्या कोनाच्या अंतर्भागातून जाणाऱ्या व त्या कोनाचे दोन एकरूप कोनात विभाजन करणाऱ्या किरणाला त्या कोनाचा कोनदुभाजक म्हणतात.
* छेदिका: जेव्हा एखादी रेषा एका प्रतलातील दोन किंवा अधिक रेषांना भिन्न बिंदूत छेदते तेव्हा त्या रेषेला छेदिका म्हणतात.
* जर छेदिकेने दोन समांतर रेषांना छेदले असेल,तर प्रत्येक जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात.
* दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता मिळणाऱ्या संगत कोनाच्या जोड्या एकरूप असतात.
* त्रिकोण: तीन बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीला त्रिकोण म्हणतात.
* त्रिकोणाला तीन कोन, तीन बाजू, तीन शिरोबिंदू असतात.
* त्रिकोणाच्या बाजू व त्रिकोणाचे कोन यांना त्रिकोणाचे घटक म्हणतात.
* त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते.
* त्रिकोणाच्या बाह्य कोना चे माप त्याच्याशी असंलग्न असलेल्या अंतर कोनाच्या मापांच्या बेरजे एवढे असते.
विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करीत असताना विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकामध्ये नोंदी घेणे अनिवार्य आहे. इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकामध्ये पुढील प्रमाणे नोंदी असाव्यात.
विद्यार्थी प्रगती पत्रक नोंदी
विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रावरील नोंदी यामध्ये आपण विशेष प्रगती नोंदी ,आवड /छंद नोंदी ,सुधारणा आवश्यक नोंदी ,व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी यादी पुढीलप्रमाणे:
प्रगती पत्रक नोंदी: Pragati patrak nondi - Ram Govardhan Dole
विशेष प्रगती नोंदी :
* दैनंदिन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो.
* दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करतो.
* दररोज शाळेत उपस्थित राहतो.
* परिपाठात सक्रिय सहभाग घेतो.
* गटकार्यात उत्कृष्ट सहभाग घेतो.
* संगणकावर छान चित्र काढतो.
* मोबाईलचा योग्य वापर करतो.
* मोठ्यांचा आदर करतो.
* शालेय शिस्त आत्मसात करतो.
* इंग्रजी वाक्य बोलतो.
* पाढे पाठांतर करतो.
* प्रभावीपणे प्रकटवाचन करतो.
* मजकुराचे वाचन समजपूर्वक
करतो.
* आत्मविश्वासपूर्वक बोलतो.
* दिलेल्या विषयावर
मुद्देसूद बोलतो.
* लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन
करतो.
* योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो.
* विविध विषयावरील चर्चेत
भाग घेतो.
* स्वत:हून प्रश्न विचारतो.
* विविध बोलीभाषेतील नवीन
शब्द समजून घेतो.
* बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
* व्याकरणानुसार भाषेचा
वापर करतो.
*भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो.
*बोधकथा,वर्तमानपत्रे,मासिके इ वाचतो माहिती
सांगतो.
*ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष
काढतो.
*गोष्टी,कविता,लेख वर्णन इ.स्वरूपाने लेखन करतो.
* मुद्देसूद लेखन करतो.
* शुद्धलेखन अचूक करतो.
* अचूक अनुलेखन करतो.
* स्वाध्याय अचूक सोडवितो.
* नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो.
* भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो.
*लेखनाचे नियम पाळतो.
*लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो.
*वाक्यप्रचार अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो.
*दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो.
*पाठातील शंका विचारतो.
*हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे.
* गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो.
* वाचनाची आवड आहे.
* कविता चालीमध्ये म्हणतो.
* शिक्षका विषयी आदर बाळगतो.
* स्वाध्याय पुस्तिका स्वतः पूर्ण करतो.
* शालेय उपक्रमात सहभाग घेतो.
* प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो.
* तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगतो.
* म्हणींचा योग्य ठिकाणी वापर करतो.
* दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो.
* गणितातील क्रिया अचूक करतो.
* तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगतो.
* इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करतो.
* चित्राचे वर्णन करतो.
* सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो.
* कार्यानुभव मधील वस्तू सुबक तयार करतो.
* तंत्रज्ञानाचा व्यवहारात उपयोग करतो.
* नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे.
* विविध वाद्य सुंदर वाजवतो.
* वेळेचे काटेकोरपणे पालन करतो.
* कागदापासून विविध आकार तयार करतो.
* रांगोळी सुंदर काढते.
प्रगती पत्रक नोंदी: Pragati patrak nondi - Ram Govardhan Dole